पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी: पाचगणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील सांस्कृतिक भवनाच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्या शुभहस्ते आणि मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक नारायणशेठ बिरामणे व सुप्रिया माने यांनी निवडणुकीत दिलेल्या शब्दाला जागत आपल्या प्रभागातूनच शहराच्या पहिल्या विकासकामाची मुहूर्तमेढ रोवल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या सोहळ्याला श्री घाटजाई शहर विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा फौजफाटा उपस्थित होता. यामध्ये आघाडी प्रमुख आणि नगरसेवक शेखर कासुर्डे, नरेंद्र बिरामणे, प्रकाश गोळे, महेश खांडके, राजेंद्र पारठे, अमित कांबळे, आकाश बगाडे तसेच नगरसेविका परवीन मेमन, विमल भिलारे, राजश्री सणस, स्वाती कांबळे, अमृता गोळे, शिल्पा माने, माधुरी कासुर्डे आणि सुप्रिया माने यांचा समावेश होता. लोकप्रतिनिधींनी पदभार स्वीकारताच कामाचा धडाका लावल्याने स्थानिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील नागरिक व पंचशील युवक मंडळ यांच्या वतीने मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात प्रकाश मोरे (गुरुजी) यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतानाच प्रभागातील रखडलेल्या कामांची वस्तुस्थिती मांडली.
आगामी काळात परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी ऍस्टनचे संचालक अमर बिरामणे, उद्योजक महेश माने, प्रशांत मोरे, संस्थेचे सेक्रेटरी नितीन कांबळे, संचालक संपत खरात, माजी उपाध्यक्ष सतीश साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते अरुण कांबळे, हौसाताई गायकवाड, रंजना घाडगे, सुनीलभाऊ भोसले, कुमार कांबळे, संदीप गायकवाड, सिद्धार्थ घाडगे, सुरज कांबळे, किशोर मस्के, शब्देश मोरे, मोहिनी गायकवाड, कमलताई शिंदे, सागर बोलके, विकास बिरामणे आणि राकेश मोरे यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सुशोभीकरणामुळे सांस्कृतिक भवनाला आधुनिक रूप प्राप्त होणार असून, भविष्यात येथील सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांना मोठी गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
पत्रकार दिनानिमित्त विशेष सन्मान
कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त विशेष गौरव करण्यात आला. समाजप्रबोधनाच्या कार्यात पत्रकारांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत मान्यवरांनी त्यांच्या लेखणीचे कौतुक केले.
























